Name of Book : रिक्त अतिरिक्त

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 160

Synopsis :
ऊस उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं, ग्रामिण माणसांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून महाराष्ट्रात साखर कारखानदारी सुरू झाली. मात्र ऊसाची टंचाई निर्माण झाली, की आपला कारखाना कमी भाव देत असला तरी कारखान्याचा सभासद असलेल्या शेतकऱ्याने आपल्याच कारखान्यात ऊस आणावा म्हणून कारखान्याचे संचालक मंडळ त्या शेतकऱ्यावर दबाव आणू लागले आणि कारखान्याच्या गाळपक्षमतेपेक्षा अधिक उत्पादन झाले, की तेच संचालक मंडळ विश्वमित्री पवित्रा घेऊ लागले, याचा अपरिहार्य परिणाम म्हणून आर्थिकदृष्ट्या मुळातच "रिक्त" असलेला शेतकरी अती "रिक्त" होऊ लागला. व त्यामुळे जगण्याचे उरलेसुरले दोर कापले गेलेला शेतकरी या "रिक्त-अतिरिक्त" कादंबरीचा विषय आहे.